इंग्लंडने टॉस जिंकला आणि भारताला मिळाल्या दोन गुड न्यूज; रोहितने निवडली धाकड टीम
क्रीडा

इंग्लंडने टॉस जिंकला आणि भारताला मिळाल्या दोन गुड न्यूज; रोहितने निवडली धाकड टीम

ॲडलेड: आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनल लढतीला सुरूवात झाली आहे. ॲडलेड ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीमधील विजेता संघ १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न मैदानावर पाकिस्तानविरुद्ध जेतेपदासाठी लढले. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

असा आहे भारतीय संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

टी-२० दोन्ही संघात २२ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १२ मध्ये भारताने तर १० मध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात दोन्ही संघातील ही चौथी लढत आहे. याआधी झालेल्या लढतीपैकी भारताने २ तर इंग्लंडने एका सामन्यात विजय मिळवला आहे. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत भारत अव्वल तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.