तिसऱ्या कसोटीसाठी भारताने उपकर्णधार बदलला; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
क्रीडा

तिसऱ्या कसोटीसाठी भारताने उपकर्णधार बदलला; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा कसोटी खेळणार ही नाही याबद्दल अद्याप निर्णय झाला नव्हता. रोहितचा फिटनेस पाहून मगच निर्णय घेणार असल्याचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. आता भारतीय संघाने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे रोहित शर्मा तिसरी कसोटी खेळणारे हे निश्चित झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर भारताने कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी दिल्यानंतर उपकर्णधाराची जबाबादीर चेतेश्वर पुजारकडे दिली होती. तेव्हा भारतीय संघ व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले होते की जर रोहित फिट झाला आणि संघात आला तर तो उपकर्णधार असेल.

विराटच्या गैरहजेरीत अजिंक्यला कर्णधारपद दिल्यानंतर उपकर्णधाराबाबत देखील कोणताही मतभेद नव्हता. उपकर्णधार म्हणून रोहितच होता. तो जोपर्यंत संघात येत नाही तोपर्यंत ही जबाबदारी पुजाराकडे देण्यात आली होती. रोहित गेल्या काही काळापासून मर्यादित षटकाच्या संघात उपकर्णधार आहे. त्यामुळे ही गोष्टी स्पष्टच आहे की विराटच्या गैरहजेरीत रोहित संघ नेतृत्वाचा एक भाग असेल. रोहितने सिडनीमध्ये १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आणि तो काल मेलबर्नमध्ये भारतीय संघात दाखल झाला.

जर रोहित सलामीला आला तर मयांक अग्रवाल संघाबाहेर जावे लागू शकते. रोहित जर मधळ्याफळीत खेळला तर हनुमा विहारी अंतिम ११ मधून बाहेर जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सिडनी मैदानावर होणार आहे. रोहितने ३२ कसोटीत ४६ च्या सरासरीने २ हजार १४१ धावा केल्या आहेत.