नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात आयपीएल 2021साठी खेळाडूंचा लिलाव होईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार, १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल, अशी अधिकृत घोषणा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने केली. पण स्पर्धा भारतात होणार की भारताबाहेर याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएल 2020चे आयोजन युएईमध्ये केले होते. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर लगेचच बीसीसीआयने पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती.
🚨NEWS🚨 – 𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟏 𝐏𝐥𝐚𝐲𝐞𝐫 𝐫𝐞𝐭𝐞𝐧𝐭𝐢𝐨𝐧𝐬
No of players retained by the franchises – 1⃣3⃣9⃣
No of players released – 5⃣7⃣More details 👇
— IndianPremierLeague (@IPL) January 21, 2021
आयपीएल 2021साठी खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या मिनी-ऑक्शननंतर स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येईल. बीसीसीआयने सध्या सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. भारतात आयपीएलचे आयोजन करण्यालाच प्राधान्य असेल. पण त्यादृष्टीने इतर सर्व गोष्टींचाही विचार करावा लागेल. युएई हा देखील पर्याय आमच्यासाठी खुला आहे. कारण, तेथे कशा पद्धतीने आयोजन करायचं याचा आम्हाला चांगला अंदाज आहे.
दरम्यान, फेब्रुवारीच्या १८ तारखेला लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा आयपीएलने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली. त्याआधी प्रत्येक संघाने २० जानेवारीला आपल्या संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द केली आहे.