पुणे : विराट कोहली भारतासाठी 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. कोहली आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या यादीत सामील झाला आहे. विराटपूर्वी, धोनी आणि अझरुद्दीन यांनी 200 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. अझरुद्दीनने 221 सामन्यांत तर, धोनीने 332 सामन्यांत कर्णधारपद सांभाळले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
जानेवारी 2017मध्ये टीम इंडियाच्या तिन्ही प्रकारात कर्णधार ठरलेला कोहलीने पुण्यात पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात ही खास कामगिरी केली. डिसेंबर 2014मध्ये धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कोहलीला भारतीय कसोटी संघाची कमान देण्यात आली.
धोनीने जानेवारी 2017मध्ये मर्यादित षटकांचे कर्णधार पद सोडले. त्यानंतर कोहलीला तीनही स्वरूपात टीम इंडियाचा कर्णधार बनविण्यात आले होते.