नवी दिल्ली : दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो पुढील काही सामने खेळू शकणार नाही. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदाच्या आयपीएल २०२१मध्ये दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न उपस्थित होता. रिषभ पंतच्या नावावर कर्णधारपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन यांच्या नावांमधून रिषभचं नाव अंतिम करण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये रिषभ पंतनं केलेल्या कामगिरीच्या जिवावर त्याला कर्णधारपद मिळाल्याची भावना त्याच्या चाहत्यांकडून आता व्यक्त होताना दिसत आहे.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
Rishabh Pant will be our Captain for #IPL2021 ✨@ShreyasIyer15 has been ruled out of the upcoming season following his injury in the #INDvENG series and @RishabhPant17 will lead the team in his absence 🧢#YehHaiNayiDilli
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 30, 2021
श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे मालिकेतल्या उर्वरीत दोन्ही सामन्यांना श्रेयस मुकला होता. शिवाय, तो आयपीएलमध्येही खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे ऐन आयपीएलच्या तोंडावर दिल्लीसाठी नवा कर्णधार ठरवण्याचं आव्हान संघ व्यवस्थापनावर येऊन पडलं होतं. श्रेयस अय्यरनंच दिल्लीला गेल्या सीजनमध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं होतं.