मुंबई : हरियाणातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना खुनी ठरवले. खुनाच्या प्रयत्नाचे आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा हा संघर्ष मिटवता येणार नाही. हे हरयाणा आणि केंद्रातील सत्ताधिशांनी लक्षात ठेवावे. अशा शब्दात शिवसेनेने आज सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि खट्टरसरकारवर टीका केली आहे. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर अंबालामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. कृषी कायद्यांविरोधात […]
Tag: सामना
वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच: शिवसेना
मुंबई : रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा. मंदिरनिर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे. असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. तसेच, आता या मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख […]
पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते; गोपीचंद पडळकर
मुंबई : खरंतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा उसा उल्लेख करु शकलो असतो पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही.” असे म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात भाजपा आमदार गोपीचंद यांचा फेकुचंद असा उल्लेख केल्यानंतर पडळकर यांनी संजय राऊतांना खरमरीत पत्र […]
मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर; त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मीठ अळणी लागत असेल : शिवसेना
मुंबई : राज्यसरकारने आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर या निर्णयावर केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यात पुन्हा वाद सुरु झाले आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेने सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ”कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झाल्याने केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर आहेत. त्यामुळे कदाचित मीठ आयुक्तांना महाराष्ट्राचे […]