गडचिरोली : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीत चकमक झाली असून या कारवाईत १३ नक्षलवादी ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. एटापल्लीमधील पेदी कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. यात १३ नक्षल ठार झाले असून मृतदेह एकत्र करण्याचं काम सुरू असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती अशी माहिती खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान आज सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली.