मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. कोरोनामुळे अद्यापही रूग्णांचे मृत्यू सुरूच आहेत. राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. राज्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १०हजारांच्या पार गेला असून १० हजार ६६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १६३ कोरोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
त्याचबरोबर, दिवसभरात राज्यात आज ११ हजार ३२ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५७ लाख ५३ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ०१ लाख २८ हजार ३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ९७ हजार ५८७ (१४.९५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ९२ हजार १०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२१,८५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.