पण मी आता थकलो आहे; म्हणत अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट करत दिले निवृत्तीचे संकेत
मनोरंजन

पण मी आता थकलो आहे; म्हणत अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट करत दिले निवृत्तीचे संकेत

सोनी वाहिनीवर सुरु असणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रमाच यंदा १२वं पर्व सुरु आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती या शोचं होस्टिंग करत आहेत. पण अमिताभ यांच्या ब्लॉगमुळे चर्चांना उधाण आलं आहे. या शोला अलविदा करणार असल्याची बातमी खुद्द बिग बींनी दिली आहे. नुकतंच त्यांनी या शोच्या शेवट्याच्या एपिसोडचं शूटिंग पूर्ण केल्याचं, त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमिताभ बच्चन हे त्यांच्या ब्लॉगमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे.… मी सर्वांची माफी मागतो… ‘कौन बनेगा करोडपती’च्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण खूपच लांबलं.… कदाचित भविष्यात पुन्हा चांगलं काम करु शकेन. पण लक्षात ठेवा काम हे काम असतं आणि ते मन लावून करायला हवं’, असं त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
‘चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी खूप सारं प्रेम मिळालं.… पण शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. थांबण्याची इच्छा नाही, पण थांबावं लागेल. मी आशा करतो की हे सगळं पुन्हा होईल. सेटवरील क्रू आणि टीममधील सदस्य खूप मेहनती आहेत. त्यांच्यामुळे सेटवर काम करण्यास प्रोत्साहन मिळतं. सेटवर सगळ्यांनी माझी काळजी घेतली. गेले अनेक दिवस आपण एकत्र काम करत आहोत. ते क्षण माझ्या कायम आठवणींमध्ये राहतील. तुम्हा सर्वांचे आभार’.

अमिताभ यांचा ब्लॉग वाचल्यावर अनेकांना ‘कौन बनेगा करोडपती १२’ हा अमिताभ यांच्या सूत्रसंचालनाचा अखेरचा सीझन तर नाही ना? असा प्रश्न पडला आहे. अमिताभ यांना आणखीन काही सीझनचं सूत्रसंचालन करताना पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बच्चन यांची ही पोस्ट पाहता ते केबीसीच्या पुढच्या पर्वात दिसणार नाहीत, असंच जवळपास स्पष्ट होत आहे. अखेरच्या भागात सारंकाही सुरळीत होतं, गोष्टींमध्ये सुसुत्रता होती. एकच इच्छा आहे, की हे सारंकाही कधीच थांबलं नाही पाहिजे. आशा करतो की, हे सारं पुन्हा घडताना दिसू शकेल, अशा अतिशय भावनिक शब्दांत त्यांनी हा ब्लॉग लिहिला. कोरोनाच्या संसर्गावर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. अतिशय दमदार पुनरागमन करत या अभिनेत्यानं पुन्हा सर्वांना अवाक् केलं.