मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर दिलासादायक बाब समोर येत आहे. राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजारांच्या खाली आला आहे. राज्यात आज ३ हजार ६४३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, १०५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिवसभरात ६ हजार ७९५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २४ लाख ४५ हजार ६८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख २८ हजार २९४(१२.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २ हजार ८८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर २ हजार ४८७ व्यक्त संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ९२४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.