मृत्यूचा आकडा घटला; मात्र, ५८९५२ नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मृत्यूचा आकडा घटला; मात्र, ५८९५२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून दिवसभरात ५८ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा ३५ लाख ७८ हजार १६० इतका झाला आहे. यापैकी आजघडीला राज्यात ६ लाख १२ हजार ०७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपासून महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ८१.२१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ५८ हजार ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राचा मृत्यूदर सध्या १.६४ टक्के इतका आहे. राज्यात दिवसभरात झालेल्या २७८ मत्यूंपैकी सर्वाधित ५४ मृत्यू हे मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये नोंदवण्यात आले आहेत. एकट्या मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळे एकूण १२ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे शहरात दिवसभरात ४ हजार २०६ कोरोना बाधित रुग्ण आढळले.