मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आजही दिवसभरात ५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत ५ हजार २२५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५ हजार ५५७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
याशिवाय, आज १५४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख १४ हजार ९२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,११,५७० झाली आहे.
सध्या राज्यात ३ लाख २९ हजार ४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार १६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५७ हजार ५७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.