मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांबरोबरच रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ९९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, ३० हजार ५३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील मृत्यू दर २.१५ टक्के एवढा झाला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आतापर्यंत राज्यात ५३ हजार ३९९ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण २ लाख १० हजार १२० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज ११ हजार ३१४ कोरोनातून बरे झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख १४ हजार ८६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.३२ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 21, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.