मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर सुरूच आहे. आज(ता. १४) दिवसभरात राज्यभरात १६ हजार ६२० कोरोनाबाधित वाढले असुन, ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२८ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
त्याचबरोबर आज ८ हजार ८६१ रुग्ण कोरोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख ३४ हजार ०७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहेत.
राज्यात आज 16620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2134072 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 14, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७५ लाख १६ हजार ८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख १४ हजार ४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८३ हजार ७१३ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ५ हजार ४९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख २६ हजार २३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.