कोरोनाचा कहर ! दिवसभराचा आकडा ३५ हजार पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा कहर ! दिवसभराचा आकडा ३५ हजार पार

मुंबई : राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर चालू आहे. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २ लाक ६२ हजार ६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज २० हजार ४४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख ८३ हजार ०३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८८ लाक ७८ हजार ७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६ लाख ८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ६२ हजार ८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार ७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.