मुंबई : राज्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही केल्या रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दरम्यान, आज २४ हजार १२६ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.६२ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज 47827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 24126 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2457494 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 389832 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 2, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,०१,९९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.