राज्यातील आजही ५०हजारांपेक्षा जास्त रुग्ण; मृतांचा आकड्यात मोठी वाढ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील आजही ५०हजारांपेक्षा जास्त रुग्ण; मृतांचा आकड्यात मोठी वाढ

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग अद्यापही दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर होत चालली असून मृतांच्या आकड्यांत मोठी वाढ होताना दिसत आहे. आज (ता. ०७) दिवसभरात राज्यात ५४ हजार २२ कोरोनाबाधित वाढले असून, ८९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर आज (ता. ०७) ३७ हजार ३८६ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.३६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८९,३०,५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,९६,७५८ (१७.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,४१,४३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,५४,७८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.