दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची घटली आकडेवारी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची घटली आकडेवारी

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत आज नव्या कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज (ता. २२) दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,१५,२४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय आज १९ हजार ४६३ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.२२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.