भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानच्या नव्या कुरापती
बातमी विदेश

भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानच्या नव्या कुरापती

मुंबई : भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने काहीना काही कुरापती या सुरुच असतात. आता लष्कराला छळण्यासाठी पाकिस्तान कुरापती करत आहे. त्याचाच नवा प्रकार म्हणजे पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत. त्यांच्याच बटालियनचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत आहेत. भारतीय जवानांकडून माहिती काढून घेण्याचा नवा फंडा पाकिस्ताननं शोधून काढला आहे. भारतातल्या आर्मी कंट्रोल रुममध्ये असे फोन येऊ लागले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लष्करी, आर्थिक आणि राजकीय अशा सगळ्या पातळ्यांवर बिथरलेला पाकिस्तान आता वाट्टेल त्या कुरापती काढू लागला आहे. पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करून सैनिकांचे काय प्लॅन ठरले आहेत हे विचारलं जात आहे. त्यामुळे भारतभरातल्या लष्करी तळांना यासंदर्भातला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय लष्करातल्या जवानांना, अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्टही पाठवत आहेत. त्यातूनही काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून भारतीय जवानांना अलर्ट करण्यात आले असून सायबर विभागही सतकर्क झाला आहे.