यशस्विनीमहिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी तीन जणांना अटक
बातमी महाराष्ट्र

यशस्विनीमहिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी तीन जणांना अटक

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आज दुपारी पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या हत्येचं कारण आणि खरा सूत्रधार कोण याबाबत माहिती देतील, अशी शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी 2014 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महिला सक्षमीकरणासाठी चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटनेची स्थापना स्थापन केली. मात्र 30 नोव्हेंबरला पुण्यातून आपलं काम आटोपून मुलगा आणि आईसोबत नगरकडे येत होत्या. मात्र नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा घाटात अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन रेखा जरे यांची हत्या केली.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सुपा पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, आरोपींच्या शोधासाठी सुपा पोलीस ठाणे, पारनेर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा अशी पाच पथकं नेमून रवाना केली होती. त्यानंतर दोन दिवसातच रेखा जारे यान्ह्या हत्येप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु रेखा जरे यांच्या हत्येचं नेमकं कारण काय हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतरच याचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.