बिहार : सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली तर भाजप अवघ्या 50 जागांवर विजयी होईल, असे धक्कादायक वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. तसेच विरोधकांची मोट बांधण्याचे कामही आपण हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता ही त्यांचे भाकीत आहे की अतिआत्मविश्वास हे अवघ्या दोन वर्षात समोर येईल.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
ध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज आणि तेवढेच आक्रमक झाले आहेत. मणिपुरमधील जनता दल युनायटेडच्या (JDU) पाच आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जेडीयुचा तिळपापड झाला आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते सध्या भाजपवर तुटून पडले आहेत. खास करुन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचा (BJP) खरपूस समाचार घेतला आहे. भाजपने पैशांच्या जोरावर आमदार फोडल्याचा आरोप त्यांनी केला. शनिवारी जेडीयूची राज्या कार्यकारणीची बैठक पाटण्यात झाली.