अग्निवीर योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली – राहुल गांधी
राजकारण

अग्निवीर योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलत असताना केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. सुरुवातीला त्यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली. या यात्रेत अनेक युवकांनी अग्निवीर योजनेची तक्रार केली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच ही योजना सैन्याला देखील रुचलेली नाही, असा दावा त्यांनी केला. सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित डोभाल यांनी ही योजना सैन्यावर थोपवली आहे, अशा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राहुल गांधी पुढे म्हणाले, “लोकांचा मुख्य रोख हा बेरोजगारी, महागाई यावर अधिक होता. अग्निवीरबाबतही अनेकांनी माझ्याजवळ त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अग्निवीरबाबत सरकार काहीही सांगत असले तरी युवक मला सांगत होते की, आम्ही सकाळी ४ वाजता धावायला जातो. खूप तयारी करतो. याआधी आम्हाला सैन्यात १५ वर्षांची सर्विस मिळत होती. आता चारच वर्षांची सेवा देणे बंधनकारक आहे. त्यानंतर काढून टाकले जाईल, पेन्शनही मिळणार नाही. तर काही सैन्यातील माजी अधिकारी देखील या योजनेवर खूश नाहीत.

ही योजना सैन्याकडून आलेली नसून राष्ट्रीय स्वयंसवेक संघ आणि केंद्रीय गृहखात्याच्या डोक्यातून आलेली आहे, असे माजी अधिकारी सांगतात. ही योजना सैन्यावर थोपलेली असून अग्निवीर सैन्याला कमकुवत करेल. हजारो लोकांना आपण शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना चार वर्षांनी समाजात सोडणार आहोत. बेरोजगारी आहे, समाजात हिंसा वाढू शकते. निवृत्त अधिकारी सांगतात की, ही योजना अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली आहे.”