सुरक्षेची खातरजमा हे राजधर्माचे पालन : काँग्रेस
राजकारण

सुरक्षेची खातरजमा हे राजधर्माचे पालन : काँग्रेस

मुंबई : राज्यातील भारतरत्नांवर दबावाने आपल्या मर्जी प्रमाणे कोणी कॅापी पेस्ट ट्वीट करवत असतील वा करण्यास बाध्य करत असतील, तर त्याची चौकशी होणे हा भारतरत्नांचा अपमान नाही. कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व सुरक्षेची खातरजमा करणे हे सत्तेत्या जराजधर्माचे पालनच आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या भारतरत्नांच्या अपमान विषयी केलेल्या निवेदनावर काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी हे बोलत होते. देशभरातील करोडो नागरीकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरसकटपणे ट्वीटरवर व्यक्त होत असतांना, ट्वीटर खाते बंद करू? म्हणून नोटीस देणाऱ्या मोदी-शहांच्या केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे, ७० वर्षे लोकशाही नांदत असलेल्या देशात धाक-दपटशाही व मनमानी चालू शकत नाही, याचे ही ऊचीत भान ठेवणे आवश्यक आहे.

भाषणजीवी प्रधानसेवकांनी लोकसभेतून देशाला संबोधित करण्याऐवजी, त्याच वेळी कृषी-बिलावर चर्चा घडवून राज्यसभेतील विरोधी सदस्यांच्या शंकांचे निरसन केले असते व घटनात्मकरीत्या
विधेयक मंजूर वा नामंजूर केले असते तर आज एवढी कसरत करावी लागली नसती. असेही गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दीलेल्या निवेदनात म्हटले आहे.