पाकिस्तानच्या विजयाने वाढवलं रोहितचं टेन्शन, हा खेळाडू भारतासाठी ठरू शकतो कर्दनकाळ
क्रीडा

पाकिस्तानच्या विजयाने वाढवलं रोहितचं टेन्शन, हा खेळाडू भारतासाठी ठरू शकतो कर्दनकाळ

सिडनी: टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना आज खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ आमनेसामने खेळत होता. पाकिस्तानच्या संघाने टी-२० विश्वचषकातील आपली उत्तम कामगिरी करत न्यूझीलंडच्या संघाला धुळीस मिळवले आणि ७ विकेट्सने या सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानने न्यूझीलंड संघावर आपला दबाव कायम ठेवला होता. पण त्यांचा एक खेळाडू आज फॉर्मात परतला आणि त्याने संघाला विजय मिळवून देण्यास मोठा हातभार लावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१० नोव्हेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड हा उपांत्य फेरीतील सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा संघ जिंकला तर तो देखील अंतिम सामन्यात दाखल होईलआणि मग भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. पण टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच आपल्या फॉर्मशी झगडत असलेला हा खेळाडू फॉर्मात परतल्याने भारतासाठी मोठा धक्का ठरू शकतो. पाहूया कोण आहे हा खेळाडू.

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आपल्या फॉर्मशी झगडत असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आजच्या सामन्यात जोरदार फाटकबाजी केली. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बाबरला खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतरच्या सामन्यांमध्येही परिस्थिती बदलली नाही. पुढच्या तीन सामन्यांतही बाबरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सुपर-१२ च्या शेवटच्या सामन्यात बाबरची २५ धावांची खेळी गाजली. या खेळीसाठी त्याने ३३ चेंडू खेळले.

उपांत्य फेरीतील अप्रतिम खेळ

टी-२० विश्वचषकातील पहिल्या ५ सामन्यांमध्ये फ्लॉप झाल्यानंतर बाबर आझमने उपांत्य फेरीत चांगली फलंदाजी केली. बाबरच्या बॅटने सिडनीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने वेगवान सुरुवात केली, मात्र बाबर आझम सुरुवातीला संथ होता. त्याने पहिल्या ९ चेंडूत फक्त ७ धावा केल्या. पण त्यानंतर लय साधली गेली.

शतकी भागीदारी

बाबर आझमने मोहम्मद रिझवानसोबत पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. बाबर ४२चेंडूत ५३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याची विकेट घेतली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५२ धावा केल्या होत्या. बाबर आणि रिझवानने पहिल्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीने न्यूझीलंडला सामन्यातून जवळपास बाहेर काढले.

विश्वचषकातील तिसरी शतकीय भागीदारी

बाबर आणि रिझवान यांच्यातील टी-२० विश्वचषकातील ही तिसरी शतकी भागीदारी होती. असे करणारी ही पहिली जोडी आहे. यासोबतच दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठव्यांदा शतकी भागीदारी केली आहे. इतर कोणत्याही सलामीवीर जोडीने फलंदाजी करताना चारपेक्षा जास्त वेळा शतकी भागीदारी केलेली नाही. रोहित-धवन, रोहित-राहुल आणि वॉर्नर-फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी ४-४ वेळा १००० पेक्षा अधिक धावा जोडल्या आहेत.