BCCI चा मोठा निर्णय, विश्वचषकातील लाजीरवाण्या पराभवानंतर दिली निवड समितीसाठी जाहीरात
क्रीडा

BCCI चा मोठा निर्णय, विश्वचषकातील लाजीरवाण्या पराभवानंतर दिली निवड समितीसाठी जाहीरात

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. पण या पराभवानंतर आता बीसीसीआने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आता निवड समितीसाठी नवीन जाहीरात दिली आहे. या जाहीरातीमध्ये निवड समिती सदस्यांसाठी का नियम असतील आणि कोण पात्र ठरतील, हे देखील स्पष्ट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीसीसीआय विश्वचषकातील पराभवानंतर मोठा निर्णय घेईल, असे वाटत होते. पण हा निर्णय कर्णधार किंवा प्रशिक्षक यांच्याबाबत घेतला जाईल, असे वाटत होते. पण आता बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विश्वचषकात ज्या निवड समितीने संघ निवडला होता, त्याची आता हकालपट्टी करण्यात आली आहे. आता बीसीसीआय नवीन निवड समिती स्थापन करणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने जाहीरातही दिली आहे. या जाहीरातीमध्ये आता कोणते खेळाडू पात्र ठरू शकतात, याची यादीही त्यांनी दिली आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीसाठी पात्रता निकष काय असतील, पाहा…

किमान किती सामने खेळलेले खेळाडू हवेत…
अ) ७ कसोटी सामने; किंवा
ब) 30 प्रथम श्रेणी सामने; किंवा
क) 10 एकदिवसीय आणि 20 प्रथम श्रेणी सामने.

अर्जदाराने किमान ५ वर्षांपूर्वी क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली असावी.

बीसीसीआयने म्हटले आहे की, “कोणत्याही क्रिकेट समितीचा (बीसीसीआयच्या नियम आणि नियमांमध्ये परिभाषित केल्यानुसार) एकूण ५ वर्षे सदस्य राहिलेली कोणतीही व्यक्ती पुरुष निवड समितीचा सदस्य होण्यास पात्र नाही.”

त्यामुळे बीसीसीआयने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता निवड समितीमध्ये आता नेमके कोणते खेळाडू हवेत, हेदेखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने आता पूर्वीची निवड समिती बरखास्त करत मोठा निर्णय घेतला आहे. पण आता हाच न्याय खेळाडू, कर्णधार किंवा प्रशिक्षक यांना लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दारुण पराभवानंतर भारतीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक कायम राहतात का, याची उत्सुकता सर्वांना असेल.