भारताचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री ९.३० वाजता का सुरु होणार, जाणून घ्या मोठं कारण
क्रीडा

भारताचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री ९.३० वाजता का सुरु होणार, जाणून घ्या मोठं कारण

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आजचा तिसरा सामना हा रात्री ८.०० वाजता नाही तर ९.३० वाजता सुरु होणार आहे. हा तिसरा सामना आज उशिरा का सुरु करण्यात येणार आहे, याचे मोठे कारणही आता समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा तब्बल तीन तास उशिरा खेळवण्यात आला. खेळाडूंच्या किट बॅग्स लवकर आल्या नसल्यामुळे हा सामना सुरु करायला वेळ लागला होता. त्यामुळे हा सामना मध्यरात्री उशिरा संपला. या मालिकेतील तिसरा सामना हा लगेच मंगळवारीच खेळवण्यात येत आहे. त्यामुळे खेळाडूंना एक सामना संपवून दुसरा सामना खेळण्यासाठी थोडी विश्रांती मिळायला हवी, यासाठी आता तिसरा सामना अडीज तास उशिराने खेळवण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. त्यामुळेच आजचा तिसरा सामना हा रात्री. ९.३० वाजता सुरु होणार आहे. या मालिकेत हे दोन सामने एकामागून एका दिवशी ठेवणे ही आयोजनातील मोठी चूक असल्याचेही आता समोर आले आहे. कारण दोन सामन्यांमध्ये किमान एका दिवसाचा तरी गॅप असायला हवा होता. जर दोन सामन्यांमध्ये एक दिवसाचा जरी गॅप असला असली तर तिसऱ्या सामन्याची वेळ पुढे ढकलण्याची वेळ वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळावर आली नसती.