भारत इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना होणार मुंबईत?
क्रीडा

भारत इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना होणार मुंबईत?

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा एकदिवसीय सामना मुंबईत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील २८ मार्च रोजी होणार आहे. हा सामना पुण्याहून मुंबईत स्थलांतरित करण्याबाबत भारतीय नियामर मंडळ (बीसीसीआय) गांभिर्यानं विचार करत आहे. इंग्लंडच्या संघाला मायदेशी रवाना होण्यास सोपं जावं, या उद्देशानं हा सामना मुंबई खेळवण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं गुरुवारी स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार असून महाराष्ट्र क्रिकट संघटना सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संपूर्ण मालिकेचं आयोजन पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे. हे सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी दिली.

मालिकेसाठी तीन मुख्य खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सामना स्वतंत्र खेळपट्टीवर खेळवण्यात यईल, असेही काकतकर यांनी सांगितलं आहे. स्टेडियममध्ये किती टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी मिळेल, याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातच होईल, असा अंदाज आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार आणि निर्णयानंतरच स्टेडिअमचे तिकीट शुल्क आणि त्याची आसन क्षमता याचा अंदाज घेऊन त्याविषयीची घोषणा करण्यात येणार आहे.