फोनवर हॅलो-हॅलो बोलताच रिकामं झालं बँक अकाउंट, विना OTP ५० लाख गायब; वाचा कसा झाला फ्रॉड
टेक इट EASY

फोनवर हॅलो-हॅलो बोलताच रिकामं झालं बँक अकाउंट, विना OTP ५० लाख गायब; वाचा कसा झाला फ्रॉड

नवी दिल्ली : अनेकांना मिस्ड कॉल, ब्लँक कॉल येतात. आपण फोनवर हॅलो-हॅलो बोलत असतो, पण दुसरीकडून कोणताही आवाज येत नाही. थोडा वेळ प्रयत्न करुन आपण फोन ठेवून देतो. पण हा मिस्ड कॉल तुमचं बँक अकाउंट खाली करू शकतो. मिस्ड कॉलद्वारे हैराण करणारा एक ऑनलाइन फ्रॉड समोर आला आहे. दिल्लीतील एका सुरक्षा एजन्सीच्या संचालकाने सायबर फसवणुकीचा विचित्र प्रकार घडल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात विना OTP केवळ मिस्ड कॉलने हॅकर्सने त्याच्या खात्यातून ५० लाख रुपये उडवले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बँकेकडून अनेकदा कोणाशीही आपला ओटीपी शेअर न करण्याचं सांगितलं जातं. मात्र या प्रकरणात मिस्ड कॉलद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. या कोणतेही बँक डिटेल्स मागण्यात आले नाहीत, किंवा ओटीपीही मागण्यात आला नाही. फोनवर केवळ हॅलो-हॅलो केल्यानंतरच अकाउंटमधून पैसे गायब झाले आहेत.

कोणतीही माहिती दिली नाही, OTP ही नाही…तरी अकाउंट झालं रिकामं

सुरक्षा एजन्सी चालवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सकाळी ७ ते ८.४५ पर्यंत सलग फोनवर काही मिस्ड कॉल आणि ब्लँक कॉल आल्याचं त्या व्यक्तीने तक्रारीत म्हटलं आहे. या व्यक्तीने आधी याकडे दुर्लक्ष केलं. पण सतत फोन आल्याने त्याने फोन उचलला. पण आवाज येत नसल्याने तो केवळ हॅलो-हॅलो करत होता. त्या व्यक्तीला वाटलं फोन करणाऱ्याला माझा आवाज येत नाही. थोड्या वेळाने कंटाळून त्याने फोन ठेवला आणि अचानक मोबाइल फोनवर एक मेसेज आला. त्याने मेसेज पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली. त्याच्या खात्यातून ५० लाख रुपये काढण्यात आले होते.

बँकेकडून मेसेज आला होता, की रियल टाइम ग्रास सेटलमेंटद्वारे ५० लाख रुपयांचं फंड ट्रान्झेक्शन करण्यात आलं होतं. हैराण करणारी बाब म्हणजे त्या व्यक्तीला कोणताही OTP आला नव्हता, की त्याने कोणत्याही लिंकवर क्लिक केलं नव्हतं. त्याने कोणाला बँक डिटेल्सही दिले नव्हते, तरी बँक खात्यातून पैसे कसे काढले गेले?

नेमकं काय घडलं?

आपल्या तक्रारीत व्यक्तीने म्हटलं, की त्याला पहिला कॉल आल्यानंतर वेगवेगळ्या नंबर्सवरुन सतत फोन आले. या कॉलमध्ये एखादा मिस्ड कॉल, तर एखादा ब्लँक कॉल असायचा. काही कॉल उचलले, तर दुसऱ्या बाजूने कोणताही आवाज आला नाही. हा प्रकार जवळपास एक ते दीड तास सुरू होता. त्यानंतर मात्र जे घडलं त्याने मोठा धक्का बसला. तक्रारदार व्यक्तीच्या खात्यातून ५० लाख गायब झाले होते आणि त्याबाबत त्याला कोणतीही माहिती नव्हती.

सायबर सेल पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितलं, की बँकेकडून ओटीपी पाठवण्यात आला होता, पण मोबाइल कॉम्प्रोमाइज झाल्याने तो ओटीपी योग्य व्यक्तीला जाण्याऐवजी हॅकर्सकडे पोहोचला.

काय असतं SIM स्वॅपिंग?

या प्रकरणात जामताडाच्या हॅकर्सनी सिम स्वॅपिंगचा वापर केला होता. सीम स्वॅप किंवा सिम स्विच या फ्रॉडमध्ये हॅकर्स टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि व्हेरिफिकेशनच्या त्रुटींचा आधार घेत तुमच्या सिमचा डुप्लीकेट वापर करुन फसवणूक केली जाते. या स्कॅमसाठी हॅकर्स तुमच्या सिम प्रोव्हाइडरच्या मदतीने स्विच करण्यासाठी पटवून देतात आणि तुम्हाला त्यांचं सिम सक्रिय करण्यास प्रवृत्त करतात. हॅकर्सच्या या जाळ्यात तुम्ही अडकलात आणि सिम अॅक्टिव्हेट केलं, तर डुप्लीकेट सिमद्वारे तुमच्या फोनचा कंट्रोल स्कॅमर्सकडे जातो. त्यानंतर हॅकर्स फोन कॉल आणि टेक्स्ट सहजपणे मिळवतात.