नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजस्थानमधील आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार […]
Author: ई-चावडी टीम
आटपाडीत मोदीसाठी लागली लाखोंची बोली; पण…
सांगली : आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात ‘मोदी’ नावाच्या बकऱ्याला ७० लाखांची बोली लागली आहे. आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यांपैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता. या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे […]
लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण
पुणे : सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेल्या कोरोना लसीवर एका स्वयंसेवकाने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणीदेखील केली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या लसीच्या चाचणीत या स्वयंसेवकाला १ ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. मात्र या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि […]
पदवीधर आमदारासाठी उद्या मतदान; ओळखपत्राव्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून धरणार ग्राह्य
पुणे : पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (ता. ०१) मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत त्यांना ओळखपत्रांशिवाय आणखी वेगळ्या ९ ओळखपत्रांद्वारे मतदान केंद्रांवर आपली ओळक दाखवता येणार आहे. कोणकोणत्या ओळखपत्रांच्या सहाय्याने करता येणार मतदान? 1) आधार कार्ड 2) ड्रायव्हिंग लायसन्स 3) पॅनकार्ड 4) पारपत्र 5) केंद्र, राज्य […]
कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी […]
रजनीकांतच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा
चेन्नई : तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत होतं. त्यावरून सुपरस्टार रजनीकांत आज काहीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांनी आजही त्यांच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा देत हा निर्णय जानेवारीपर्यंत पुढे ढकलला असल्याचे समोर आले आहे. अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का? अशी चर्चा […]
अजान पठण स्पर्धेवरून प्रवीण दरेकारांची पांडुरंग सकपाळ यांच्यावर टीका; म्हणाले…
नवी मुंबई : ”पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं बदलतं स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाली आहे. ” अशी टीका भाजपा नेता प्रवीण दरेकर यांनी […]
एका रात्रीत स्टार झालेल्या या अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोकचा झटका; प्रकृती गंभीर
मुंबई : ९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आशिकी या चित्रपटामुळे एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. राहुल रॉय सध्या आपल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याला हा झटका आला असून तेव्हांच त्याला नानावटी रूग्णालयात दाखल […]
मंत्र्यासोबत केलं नाही डिनर म्हणून थांबवलं विद्या बालनच्या चित्रपटाचं चित्रीकरण; कोण आहेत ते मंत्री?
भोपाळ : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या शेरनी चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे. मंत्र्यासोबत डिनर केले नाही म्हणून हे चित्रिकरण थांबविण्यात आल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशची मंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, विद्याने हे आमंत्रण स्वीकारलं नाही. त्यानंतर अचानकपणे तिच्या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचं […]
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला; नारायण राणेंचा आरोप
नवी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ज्येष्ठ भाजपा नेता आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने त्यांनी असंख्य मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. अशी खरमरीत टीका राणे यांनी केली आहे. ”राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे.कोरोना […]