दया ‘या’ मालिकेतून पुन्हा येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

दया ‘या’ मालिकेतून पुन्हा येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सीआयडी मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील दया हे पात्र घराघरात पोहोचले होते. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता हा दया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेता दयानंद शेट्टी सावधन इंडिया या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. दयाला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते आनंदी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सावधन इंडिया ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. आता दया या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

दया सोबत या मालिकेत अंकुर नय्यर आणि मानिनी मिश्रा हे कलाकार देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता मालिकेच्या निर्मात्यांनी सूत्रसंचालना करता दयाची निवड केली आहे. दयानंदने अमर उजालाला याबाबत माहिती दिली आहे. हो, मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी पहिल्यांदाच एका शोचे सूत्रसंचालन करणार आहे. एक सूत्रसंचालक म्हणून सावधान इंडिया मालिकेत काम करताना मला आनंद होत आहे, असे त्याने म्हटले आहे.