”आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?” कंगना-दिलजीतच्या ट्विटर वॉरमध्ये मिका सिंहची उडी
मनोरंजन

”आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?” कंगना-दिलजीतच्या ट्विटर वॉरमध्ये मिका सिंहची उडी

”आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?” असा प्रश्न विचारात गायक मिका सिंहने आता अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्या वादात उडी घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला कंगना रानौतने विरोध केला आहे. तर दिलजीत दोसांजने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कंगना रणौतने या आजींची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केल्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केल्यानंतर तिने ते ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

अशातच दिलजीत दोसांज आणि कंगनाचे ट्वीटर वॉर सुरु झाले आहे. तर या वॉरमध्ये मिकासिंहने उडी घेत कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणं सोपं आहे पण दररोज लोकांना मदत करण सोप नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन मिक्कानं कंगनावर निशाणा साधला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

https://twitter.com/SRKs_Ansh/status/1334763664969060352?s=20

काय आहे कंगना रानौत आणि दिलजीत दोसांजचे प्रकरण?
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ यांच्यात सुरु झालेले ट्विटर वॉर आता शिगेला पोहोचला आहे. कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे पातळी सोडून दिलजित दोसांझ याच्यावर टीका केली. मात्र, दिलजित दोसांझ यानेही कंगनाला तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती.

त्यावर कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली. तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले. तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रानौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली.

कंगनाच्या या ट्विटला दिलजित दोसांझ यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. तू आजपर्यंत जितक्या जणांबरोबर चित्रपट केलेस, त्यांची तू पाळीव आहेस का? मग तर ही यादी वाढतच जाईल. आम्ही बॉलिवूडवाले नाही तर पंजाबवाले आहोत. खोटं बोलून लोकांना चिथवणे आणि भावनांशी खेळणे तुला चांगले जमते, असे दिलजितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी ट्विट करून दिलजित दोसांझला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेत्री स्वरा भास्कर याचा समावेश आहे.