मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालाच्या बहुचर्चित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अर्जुन रामपालने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. हा ऐतिहासिक चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसह अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंहही दिसणार आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अर्जुनची वाढलेली दाढी, लांब केस आणि हातातील शस्त्र दिसत आहे. त्यामुळे अर्जुन एखाद्या योद्ध्याप्रमाणे भासत आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना अर्जुनने Proud to be part of a historical event that blew my mind and is sure to blow yours, असे कॅप्शन दिले आहे. तसेच, “या एका ऐतिहासिक घटनेचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान आहे. यामुळे माझं मन हेलावून गेलं आहे. त्यामुळे तुमचेही मन हेलावून जाईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे येत्या 2021 ला #TheBattleofBhimaKoregaon सज्ज व्हा,” असे कॅप्शन अर्जुनने या पोस्टरला दिले आहे.
Proud to be part of a historical event that blew my mind and is sure to blow yours. #TheBattleofBhimaKoregaon coming in 2021 pic.twitter.com/3rdig3VgSy
— arjun rampal (@rampalarjun) December 10, 2020
काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास?
या चित्रपटाची कथा 1 जानेवारी 1818 मध्ये भिमा कोरोगाव येथे झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांमध्ये झालेल्या वादग्रस्त लढाईवर आधारित आहे. ब्रिटिशांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात महार सैनिकांचा समावेश होता. त्यांनी बऱ्याच बलाढ्य अशा सैन्याला मागे टाकले होते. या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला होता. मात्र या विजयामुळे महार समाजातील लोकांनी आनंद व्यक्त केला होता. कारण त्या काळात महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानले जाते. या दोघांमधील युद्धा कोरोगावची लढाई म्हणून ओळखले जाते.
आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.
फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि मराठ्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकांत सापडतो. रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचलं. तिथे त्यांनी 25 हजार मराठ्यांना रोखलं. ते नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिले. ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटत होतं. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं वाटेतल्या गावावर कब्जा केला आणि त्याचं रुपांतर गढीत केलं.
ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी अनेक जण हे महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटलं जातं.