सहावीत असतानाच वरूण पडला नताशाच्या प्रेमात ; वाचा, कशी सुरु झाली दोघांची लव्ह स्टोरी
मनोरंजन

सहावीत असतानाच वरूण पडला नताशाच्या प्रेमात ; वाचा, कशी सुरु झाली दोघांची लव्ह स्टोरी

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि त्याची बालमैत्रिण नताशा दलालसोबत आज लग्नबंधनात अडकणार आहेत. अलिबाग येथील द न्यू मेन्शन या अलिशान रिसॉर्टमध्ये हा शाही लग्नसोहळा होणार आहे. लग्नाचे विधी सुरु झाले आहेत आणि सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त असतानाही या सेरेमनीचा पहिला समोर आला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का वरुण आणि नताशा एकमेकांना कसे भेटले, बालमैत्रीचे रुपांतर प्रेमात कसे झाले, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नताशा आणि वरुण दोघेही बालपणापासून मित्र आहेत. दोघांनीही बारावी पर्यंत एकाच शाळेत शिक्षण घेतले. वरुण’ने करीना कपूरच्या एका रेडीओ सो’मध्ये याबाबत खुलासा केला होता की, जेव्हा तो नताशाला पहिल्यांदा भेटला त्यावेळी ते दोघेही सहावीत शिकत होते. त्यानंतर दोघेही १२ पर्यंत खूप चांगले मित्र होते.

दोघेही मानेकजी कूपर स्कूलमध्ये शिकते. वरूण रेड हाऊसमध्ये होता आणि नताशा यॅलो हाऊसमध्ये. दोघेही एकत्र बॉस्केटबॉल खेळायचे. नताशा वरूणला फक्त आणि फक्त मित्र मानत होती. पण वरूण कधीच नताशाच्या प्रेमात पडला होता. एकदा लंचब्रेकदरम्यान वरूणला नताशा दूरून चालत येताना दिसली आणि त्या क्षणालाच तो तिच्या प्रेमात पडला.

नताशाने वरूणला तीन-चारदा रिजेक्ट केले होते. पण वरूणने हार मानली नाही. तो प्रयत्न करत राहिला आणि अखेर त्याचा प्रेमप्रस्ताव नताशाने स्वीकारला. नताशा एक फॅशन डिझाईनर आहे. न्यूयॉर्कमध्ये ती फॅशन डिझाईन शिकली आहे.

कोरोनाचा धोका बघता वरुण आणि नताशाच्या लग्नाला केवळ 50 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या 50 पाहुण्यांच्या यादीमध्ये नताशा आणि वरुणच्या कुटुंबीयांना, जवळचा मित्रपरिवार आणि इंडस्ट्रीमधील काही मोजक्याच लोकांचा समावेश आहे.

वरूणच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजर राहणार आहेत. सलमान खान, शाहरूख खान, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, आलिया भट,रणबीर कपूर, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस हे स्टार्स वरूण-नताशाच्या लग्नात सहभागी होणार आहेत. मनीष मल्होत्रा व शशांक खेतान आधीच लग्नाला पोहोचले आहेत.