आत्मनिर्भर भारतासाठी शाओमीची मोठी घोषणा
लाइफफंडा

आत्मनिर्भर भारतासाठी शाओमीची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. यात विशेष भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन्स विकणारी कंपनी शाओमी ने आता घोषणा केली आहे की, आगामी काळात भारतात विकल्या जाणाऱ्या मी आणि रेडमीचे ९९ टक्के स्मार्टफोन्स सोबत १०० टक्के स्मार्ट टीव्हीचे प्रोडक्ट भारतात तयार केले जाणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

म्हणजेच आता विदेशी टेक्नोलॉजी कंपन्या सुद्धा आता भारतात मेक इन इंडिया प्रोडक्ट हळूहळू बनवण्यासाठी फोकस करीत आहेत. मेड इन इंडिया प्रोडक्ट खरेदीसाठी आता जोर दिला जात आहे. तसेच, भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टवॉच सह अन्य प्रोडक्ट्स आता जास्तीत जास्त भारतात बनवले जात आहेत. शाओमीचे इंडिया हेड आणि ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांनी याला सार्वजनिक केले आहे. शाओमी लवकरच भारतात मोबाइल मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट आणि एक टेलिव्हिजन प्लांट उघडणार आहे. ज्यात शाओमीचे प्रोडक्टस तयार केले जाणार आहेत.

शाओमीच्या इंडिया प्रमुखाने एका मुलाखतीत हे सांगितले की, सध्या भारतात शाओमीचा एक मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट तयार झाला आहे. यात शाओमीचे डिव्हाइसचे प्रोडक्शन सुरू करण्यात आले आहे. मेक इन इंडिया मजबुत करण्यासाठी शाओमी प्रयत्न करणार आहे. भारतात विकले जाणारे १०० टक्के प्रोडक्शन भारतात तयार केले जातील. तसेच आम्ही एक्सपोर्ट्स वाढवण्यासाठी सुद्धा फोकस करणार आहोत. त्याचबरोबर भारतात बनवण्यात येणाऱ्या रेडमी आणि मीचे प्रोडक्ट्स बांगलादेश आणि नेपाळला निर्यात केले जातील. भारताला एक्सपोर्ट हब बनवण्याची तयारी केली जात आहे. शाओमीला भारतात खूप मागणी आहे. त्यावर आता फोकस केले जाणार आहे.