8/12 च्या भारतबंदबाबत बेस्ट प्रशासन आणि टॅक्सी युनियनचा महत्वाचा निर्णय
देश बातमी

8/12 च्या भारतबंदबाबत बेस्ट प्रशासन आणि टॅक्सी युनियनचा महत्वाचा निर्णय

मुंबई : भारतातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. याला राज्यातील विविध संघटनांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र, दरम्यान भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. बेस्ट प्रशासनाने याबद्दल माहिती दिली. तसेच टॅक्सी देखील रस्त्यावर नियमित धावतील असे टॅक्सी युनियनने स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बेस्ट बसेस उद्या रस्त्यांवर धावतील. त्या भारत बंदचा भाग नसतील असे बृहन्मुंबई वीज आणि वाहतूक विभागाने सांगितले. बसेच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहेत. बसच्या खिडक्यांवर लोखंडी जाळ्या आणि इतर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल असेही बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. शेतकरी संघटना कायदा रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण केंद्र सरकार कायदा रद्द करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या बंदमध्ये एपीएमसी मार्केट देखील सहभागी होणार असून भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे. सोबतत माथाडी कामगार देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.