मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वचजण हैराण झालेले असताना एक दिलासादायक बातमी समोर आली असून राज्याचा रुग्णआलेख घसरणीला लागल्याचे दिसून येत आहे. रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या ५० हजारांखाली नोंदविण्यात आली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात रविवारी कोरोनाचे ४८ हजार ४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात तीन लाख नमुन्यांची चाचणी केल्यानंतर शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या पाच हजारांनी घटली. गेल्या सोमवारी राज्यात ४८ हजार ६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आज 48401 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 60226 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4407818 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 615783 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.4% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 9, 2021
राज्यात सध्या ६ लाख १५ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. त्याचबरोबर मुंबईमधील कोरोनावाढीचा सरासरी दर रविवारी ०.४४ टक्क्य़ांपर्यंत घसरला. मुंबईत रविवारी केवळ २,४०३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.