कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत आघाडीवर : गीता गोपीनाथन
देश बातमी

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत आघाडीवर : गीता गोपीनाथन

नवी दिल्ली : ”कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत आघाडीवर आहे. कोरोना काळात लस तयार करणे आणि ती लस इतर देशांत पाठवण्यात भारताने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबद्दल भारतीची कौतुक करायला हवं.” अशा शब्दात इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या (IMF) मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथन यांनी भारताचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी आयोजित डॉ. हंसा मेहता व्याख्यानमालेदरम्यान त्या बोलत होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गीता गोपीनाथन यांनी म्हणाल्या की, लसीकरणाच्या धोरणाबाबत भारताने खरोखरच उल्लेखनीय कार्य केले आहे. जेव्हा तुम्ही पाहाल की जगात लस निर्मिती केंद्र कुठे आहे तर ते तुम्हाला भारतात आढळून येईल. गोपीनाथन यांनी पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे कौतुक केले. सीरम इन्स्टिट्युटने जगातील सर्वाधिक कोरोना लसीचे डोस तयार केले. त्यानंतर ही लस जगभरातील देशांमध्ये पुरवली गेली.

दरम्यान, जगभरात आतापर्यंत 11 कोटी 77 लाख 23 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर भारतात आतापर्यंत एक कोटी 12 लाख 44 हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात 2 कोटी 9 लाख 89 हजार 10 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे.