नवी दिल्ली : देशात करोनाचा कहर सुरुच असून नव्या रुग्णांचा आकडा घटत असला तरी मृत्यूचा कहर सुरुच असून गेल्या २४ तासांत कोरोना बळींच्या नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. भारतात, गेल्या २४ तासात कोरोना संक्रमणामुळे ४ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आज (मंगळवार) आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ६३ हजार ५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४ लाख २२ हजार ४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतात आतापर्यंत २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६ कोरोना केसेस आढळले आहेत. तर २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. २ लाख ७८ हजार ७१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३ लाख ५३ हजार ७६५ बाधित कोरोना रुग्ण आहेत.