राज्यातील नवीन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांत पुन्हा वाढ; तर १८० मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील नवीन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांत पुन्हा वाढ; तर १८० मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप राज्यात मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. मागील २४ तासांच्या तुलनेत आज नवीन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात राज्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील काही दिवसांपासून दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात ९ हजार नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १८० रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ५ हजार ७५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ५४, ८१, २५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२, १४, १९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५, ६७, ५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार ६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १, ०३, ४८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.