दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा घट; दिवसभरात १३९ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा घट; दिवसभरात १३९ मृत्यू

मुंबई : कोरोनाग्रस्तांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात कालच्या तुलनेत पुन्हा आज कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात राज्यात २७ हजार ९१८ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, १३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५४ हजार ४२२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,४०,५४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याशिवाय आज २३ हजार ८२० रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३,७७,१२७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.७१ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १७ हजार ६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.