राज्यातील मृत्यूचा वाढला आकडा; तर दिवसभरात ३५ हजाराहून अधिक कोरोनाबाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील मृत्यूचा वाढला आकडा; तर दिवसभरात ३५ हजाराहून अधिक कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. आज मृत्यूंचा आकडा वाढला आहे. आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ३५ हजार ७२६ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज १४ हजार ५२३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.५८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.