कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; मोठ्या कालखंडानंतर आकडा एवढा खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; मोठ्या कालखंडानंतर आकडा एवढा खाली

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून आज मोठ्या कालखंडानंतर नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ हजारांच्या खाली आला आहे. आज राज्यात २ हजार ९४९ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात ४ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के इतके झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आज ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के एवढा झाला आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ४०६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात २ हजार ९४९ रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ इतकी झाली आहे.