मुंबई : महाराष्ट्र निवनिर्माण सेना राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका संपूर्ण ताकदीनं लढवणार असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. ट्विटरवर दिलेले निवेदन हे बाळा नांदगावकर यांनी सही केलेले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
नांदगावकर यांच्या स्वाक्षरीनं काढलेल्या या निवेदनात म्हटलं की, संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येतं की, आपण आपल्या ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे उमेदवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावं
महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणुकांसाठी सज्ज व्हा; सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार ! #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/Vokyjx4Esk
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 14, 2020
पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ज्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या संपूर्ण माहितीचा तपशील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला पोस्टाद्वारे आणि ई-मेलद्वारे पाठवावा, असे आवाहनही मनसेकडून करण्यात आलं आहे.