राज्यात पुन्हा ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका मात्र कायम आहे. आज राज्यात ४ हजार १७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या आसपास असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासात ४ हजार १५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८ हजार ४९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९७.०९ टक्के इतकं आहे. राज्यात सध्या ४७ हजार ८८० रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात आज ६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५३ लाख ३८ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७२ (११.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०७ हजार ९१३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर १ हजार ९३७ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.