मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कायम असून मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात ८५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर ५४ हजार ५३५ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ४२ हजार ५८२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दररोजची करोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कमी आढळून येत आहे. ही बाब दिलासादायक असली तरी परंतु, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही मोठी वाढ दिसून येत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८८.३४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ७८ हजार ८५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
राज्यात आज 46781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 58805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4600196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 546129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 12, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख ६९ हजार २९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ०२ हजार ६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५ लाख ३३ हजार २९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.