मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६० जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ हजार ३१३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४ लाख ७७ हजार ९८७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १लाख ३७ हजार ६४३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार ०९८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर १ हजार ९५४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५० हजार ४६६ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.