राज्यात दिवसभरात ४ हजार ३६५ जण कोरोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ४ हजार ३६५ जण कोरोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. राज्यात आज ४ हजार ३६५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, १०५ कोरोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तसेच, ६ हजार ३८४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख २१ हजार ३०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४ लाख १५ हजार ९३५ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १ लाख ३५ हजार ६७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १९ लाख २१ हजार ७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख १५ हजार ९३५ (१२.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २२ हजार २२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५५ हजार ४५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.