राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली; तिसऱ्या लाटेचे संकेत?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली; तिसऱ्या लाटेचे संकेत?

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. मागील २४ तासांतही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा ५ हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे हे तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिवसभरात राज्यात ५ हजार ०३१ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ४ हजार ३८० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, २१६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४ लाख ३६ हजार ६८० झाली आहे. आतापर्यंत राज्यात १ लाख ३६ हजार ५७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण ५ कोटी २८लाख ४०हजार ८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ३७ हजार ६८० (१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २लाख ९८ हजार २६४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर २ हजार ३६९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५० हजार १८३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.