राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढला; २५२ रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढला; २५२ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचे वेग कमी झालेला दिसत असतानाच नवीन करोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ झाल्याचे आढळून आले आहे. आज (ता. ०१) दिवसभरात राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत जास्त दिसून आली आहे. राज्यात दिवसभरात ९ हजार १९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ८ हजार ६३४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख २८ हजार ५३५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आज २५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १८ लाख ७५ हजार २१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ७० हजार ५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १६ हजार ६६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.