मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात ९ हजार ८५५ नवीन कोरोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ४३ हजार ३४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाक ०९ हजार ५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ७९ हजार १८५ (१३.२० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८२ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 3, 2021
केंद्र शासनाच्या आदेशानुसार, देशात सध्या कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरूवात झालेली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात केले जात आहे. तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जात आहे.